आमचे लेखक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल १८९१ - ६ डिसेंबर १९५६), ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणून ओळखले जाते ते एक भारतीय कायदेतज्ज्ञ , अर्थशास्त्रज्ञ , राजकारणी , लेखक आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य ( दलित ) विरुद्ध सामाजिक भेदभावाविरुद्ध मोहीम राबवली आणि महिला आणि कामगारांच्या हक्कांनाही पाठिंबा दिला . ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते, भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार होते 

१९५६ मध्ये, दीक्षाभूमीत , त्यांनी ६,००,००० समर्थकांसह दलितांचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर सुरू केले . त्यांनी भारतात बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन केले. आंबेडकरांना नवयान बौद्धांमध्ये बोधिसत्व आणि मैत्रेय म्हणून ओळखले जाते .

१९९० मध्ये, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, भारतरत्न , आंबेडकरांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. आंबेडकरांच्या वारशात लोकप्रिय संस्कृतीतील असंख्य स्मारके आणि चित्रणांचा समावेश आहे. सामाजिक-राजकीय सुधारक म्हणून आंबेडकरांच्या वारशाचा आधुनिक भारतावर खोलवर परिणाम झाला. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. किशोर कवठे

जन्म : ९ डिसेंबर १९७८
Email : kishorkawathe2@gmail.com

डॉ. किशोर कवठे हे आदिवासी आश्रमशाळेत माध्यमिक अध्यापक असून कवी, स्तंभलेखक, लघुकथा लेखक आणि सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक म्हणून परिचित आहेत. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आयोजित पहिले युवा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष राहिले. पसरत गेलेली शाई, गावसूक्त, दगान, विराणी हे त्यांचे प्रसिद्ध कवितासंग्रह. ऐसा चेतला अभंग हा संपादित ग्रंथ. दिशा अंधारल्या जरी हा ललितलेख संग्रह त्यांचा प्रकाशित आहे. ‘झाडीबोली साहित्यिक ना.गो. थुटे यांच्या समग्र साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ या विषयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून आचार्य पदवी प्राप्त. राज्यस्तरीय अभंग साहित्य संमेलनाचे संयोजक. अक्षर साहित्य कला प्रतिष्ठान, सप्तरंग व नाते आपुलकीचे या संस्थांच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

डॉ. किशोर कवठे 

नरेंद्र सोनारकर

Email: narendrasonarkar75@ gmail. com

शालेय जीवना पासूनच कविता लेखन. १९९४ पासून पत्रकारिता. दै.चंद्रधून, महासागर, महाभारत वृतपत्रात जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम. दै.लोकमत, जनवाद, नवराष्ट्र, लोकशाही वार्ता, सामना, महाविदर्भ, प्रिंट मेल, साप्ताहिक आंबेडकरवाद आदी दैनिके व साप्ताहिकात कविता, लेख प्रकाशित. विविध साहित्यिक, सांस्कृतिक व परिवर्तनवादी चळवळींच्या कार्यक्रमाचे निवेदन. पुरोगामी साहित्य संसदचे संस्थापक. त्याद्वारे राज्यस्तरिय पहिले पुरोगामी साहित्य संमेलनाचे आयोजन. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणा-या आंदोलनात, मोर्चात सक्रिय सहभाग. साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत. 'वन वे' हा कवितासंग्रह व 'फेस बुक' ही कादंबरी प्रकाशनाधिन.

नरेंद्र सोनारकर 

प्रकाशित ग्रंथ : कोर्टाच्या आवारात

राजेश मडावी

राजेश तुळशिराम मडावी

मूळचे इल्लूर (ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) येथील रहिवासी असलेले राजेश तुळशिराम मडावी हे गेल्या दोन दशकांपासून मुख्य प्रवाहातील पत्रकारितेत सक्रिय आहेत. एम.ए. (मराठी), बी.एड. आणि एम.एस.डब्ल्यू. (समुदाय विकास) असे शिक्षण पूर्ण केलेले मडावी सध्या चंद्रपूर येथे वास्तव्यास आहेत.

राजेश मडावी यांच्या लेखणीतून आजवर विविध दैनिके, साप्ताहिके आणि मासिकांमध्ये ४५७ पेक्षा जास्त अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध झाले आहेत. प्रख्यात कवी भुजंग मेश्राम यांच्या गोंडी बोलीतील काव्यसंग्रहाचा त्यांनी केलेला मराठी अनुवाद २०१८ मध्ये लोकवाङ्मय गृह, मुंबईतर्फे प्रकाशित झाला आहे. याशिवाय, महाराष्ट्रातील बोली भाषा अभ्यास प्रकल्पातर्गत त्यांनी प्रेमानंद गज्वी व डॉ. महेश केळुस्कर यांच्या मार्गदर्शनात गोंडी भाषेवर महत्त्वपूर्ण संशोधनपर लेखन केले आहे.

'मीडिया वाच' सारख्या प्रतिष्ठित अंकासाठी 'दंडकारण्यातील बंगाली' या विषयावर त्यांनी विशेष रिपोर्ताज लिहिला. ‘शरद पवार आणि महाराष्ट्र’ यासारख्या महत्त्वाच्या संशोधन प्रकल्पातही त्यांचा लेखक म्हणून सहभाग राहिला आहे. राजुरा येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील चौथ्या 'उलगुलानवेध' चिंतन बैठकीचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. 'आदिवासींचे अस्तित्व व अस्मितेचे भविष्य' या विषयावर अ. भा. नारायणसिंह उईके संघर्ष समितीद्वारे त्यांची अध्यक्षीय भाषणाची पुस्तिका २०२४ मध्ये प्रकाशित झाली आहे.

शंकर लोडे

Email : shankarlode7920@gmail.com

शंकर लोडे हे कवी, नाट्यकलावंत, कलारसिक म्हणून परिचित आहेत. त्यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १९९१ साली लिपीक म्हणून सेवेला प्रारंभ केला. तब्बल ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते बँकिंग ऑफिसर ग्रेड-१ या पदावरून मुख्यालयातून सेवानिवृत्त झाले. लहानपणापासूनच त्यांना लिखाण, भजन-गायन आणि अभिनय यांची विशेष आवड आहे. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेतला असून घर देता का घर, अंधाधुंद, एक रात्र पावसाळी आणि तांडा या नाटकांमध्ये प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. अंधाधुंद या नाटकातील अभिनयासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्तम अभिनय पुरस्कार प्राप्त झाला आहे. चित्रपट आणि लघुपट क्षेत्रातही त्यांनी आपली छाप उमटवली आहे. हद्द-२ या चित्रपटात त्यांनी राजकीय नेत्याची भूमिका साकारली असून सोन्या, किस्सा टिकट का आणि आखिरी स्टेटस या लघुपटांमध्येही काम केले आहे. सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक आणि कला क्षेत्रात ते सक्रिय असून आपल्या बहुआयामी कार्यातून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

 

शंकर खुशालराव लोडे

प्रकाशित ग्रंथ : पुढे कसे होईल